महाराष्ट्र

रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादनाला सुरुवात, संभाजीनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत.

हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू

जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, फतियाबाद, तलेसमन, सावंगी, दायगाव, रोटेगाव, लासूरगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदेवाडी आदी गावांतील शेतजमिनींचा समावेश आहे.

कामाचा वेग आणि प्रगती

दुहेरीकरणाचे काम दोन टप्प्यांत राबवले जात आहे

अंकाई ते करंजगाव

करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर

या दोन्ही टप्प्यांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ३० किमी पर्यंत सपाटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १० पुलांवर कामे सुरू आहेत.

रेल्वेची क्षमता दुप्पट होणार

सध्या एकेरी मार्ग 115% क्षमतेने कार्यरत असून, दुहेरीकरण झाल्यानंतर ही क्षमता 143% पर्यंत वाढणार आहे.

औद्योगिक मालवाहतूक, प्रवासी रेल्वे, आणि दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रकल्पाचा फायदा या भागातील ९८ लाख लोकसंख्येला व ३८ गावांना होणार आहे.

दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरून अवजड मालवाहतूक; तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी मदत होईल.

प्रकल्प पूर्णत्वाची अपेक्षित तारीख – डिसेंबर २०२६

या महत्वाकांक्षी कामासाठी दोन ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी वेळेत काम पूर्ण केल्यासच नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

3 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

11 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

12 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

13 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

17 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

17 तास ago