महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले मंत्रिपद गमवावे लागू शकते. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

काही मंत्री आधीच विविध वादांमुळे अडचणीत सापडले आहेत, तर काहींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याऐवजी नाराज असलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना ही संधी दिली जाऊ शकते, असेही ‘सामना’ने म्हटले आहे. सरकारचा १०० दिवसांचा कार्यक्रमही या मंत्र्यांना समाधानकारकपणे राबवता आलेला नाही,

कोणते आठ मंत्री 

आठ मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत, त्यात खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे

माणिकराव कोकाटे

संजय शिरसाट

योगेश कदम

नरहरी झिरवळ

नितेश राणे

जयकुमार गोरे

भरत गोगावले

दादा भुसे

या मंत्र्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त घटनांमुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वादाच्या भोवऱ्यातील मंत्र्यांची पार्श्वभूमी

माणिकराव कोकाटे: सातत्याने वादग्रस्त विधाने करणे आणि विधानसभेत रमी खेळताना आढळल्याने ते चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले होते.

संजय शिरसाट: त्यांच्या घरी नोटांची बंडले आढळल्याने आणि हॉटेल लिलावातील आरोपांमुळे ते वादात सापडले आहेत. यापूर्वी त्यांच्या मुलावरही आरोप झाले होते.

योगेश कदम: गृहराज्यमंत्री योगेश कदम ‘सावली बार’ प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. ठाकरे गटाने त्यांच्यावर यावरून सातत्याने टीकेची झोड उठवली आहे.

नरहरी झिरवळ: कार्यकर्त्यांशी संवाद नसल्याचा आणि आपल्या मतदारसंघात अपेक्षित काम न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

नितेश राणे: आपल्या अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच रडारवर असतात आणि त्यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे: एका महिलेने केलेल्या आरोपानंतर जयकुमार गोरे वादाच्या केंद्रस्थानी आले होते. त्यांना ग्रामविकास खात्याचा कारभार देण्यात आला आहे.

दादा भुसे: हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे आणि शालेय शिक्षण विभागातील काही वादग्रस्त निर्णयामुळे ते चर्चेत राहिले आहेत. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे म्हटले जात आहे.

भरत गोगावले: त्यांच्या नावाभोवती अद्याप स्पष्ट माहिती नसली तरी, त्यांनाही मंत्रिपद गमवावे लागू शकते, असा दावा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काळात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत धुसफूस आणि विरोधकांच्या टीकेला आता अधिक धार येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

3 मिनिटे ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

7 मिनिटे ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

2 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

2 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago