महाराष्ट्र

आशाताईंनी स्वर समाधी घेतली! चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहोत; एकनाथ शिंदे

मुंबई: ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आशाताईंनी मराठी आणि हिंदीच नाही तर तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा जवळपास २० भाषांमधील गाणी गायली. सुख-दु:खात त्यांची गाणी ऐकायचो. खासकरुन दु:खाच्या प्रसंगी त्यांची गाणी आधार वाटतात. आजही त्यांनी गायलेली हजारो गाणी कालची ताजी गाणी असल्याचा भास होतो. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत आशाताईंची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

आशा ताईंना अनेक पुरस्कार मिळाले पण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे संधी मला मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. आशाताईंनी लाडकी बहिण योजनेचे कौतुक केले होते. १५०० रुपयांचे मोल किती आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही योजना हवी होती, असेही आशाताई म्हणाल्या होत्या. कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरिबीचे चटके सहन केले होते, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, आशाताईंना शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

13 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

13 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

13 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

13 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

13 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

13 तास ago