महाराष्ट्र

त्या तहसीलदारांची बदली झाल्याने आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप

जामखेड: जामखेड तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी निघालेल्या या बदलीच्या आदेशानंतर तहसीलदार माळी यांना धानोरा (जि. गडचिरोली) येथे पाठवण्यात आले आहे.

अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीदरम्यान गट रचनेत विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधारी गटाचा आदेश तहसीलदार माळी यांनी नियमांचे पालन करत नाकारला. यामुळे नाराज झालेल्या सत्ताधारी नेत्याने त्यांची बदली केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून, काही गावांचा दुसऱ्या गटात समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दबाव होता. मात्र, तहसीलदार माळी यांनी नियमांचा आदर करत हा आदेश मान्य केला नाही. यावरून एका वजनदार नेत्याने त्यांच्यावर फाइल फेकल्याची चर्चाही आहे. सत्ताधारी गट नेहमीच आपल्या सोयीने गट रचना करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच कारणामुळे तहसीलदार माळी यांची गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बदली झाल्याचे मानले जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, सत्तेचा गैरवापर करून प्रामाणिक अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून ही बदली केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत, “जिल्हा परिषदेच्या गट रचनेत राजकीय सोयीनुसार गावांचा समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मानला नाही, म्हणून अहंकारी नेत्याने त्यांना गडचिरोलीला पाठवले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना क्षणिक समाधान मिळेल, पण याचा प्रशासनावर विपरित परिणाम होईल. प्रामाणिक अधिकाऱ्यांना अशी शिक्षा मिळत असेल, तर त्यांनी सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनावे का? नव्या तहसीलदारांकडून गट रचनेत अपेक्षित बदल होतात का, याकडे आमचे लक्ष आहे,” असे म्हटले आहे.

हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही.”. असे रोहित पवार यांनी म्हणले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

28 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

14 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

20 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

20 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

20 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

20 तास ago