महाराष्ट्र

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण भावाची वाट पाहते. अशा दिवशी बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्याची सक्ती करणे म्हणजे त्यांच्यावर भावनिक अन्याय करणे होय.

सरकारने एकीकडे सुट्टी जाहीर करून रक्षाबंधनाच्या महत्त्वाला मान्यता दिली आहे आणि दुसरीकडे अशाच दिवशी परीक्षा घेणे ही थेट विरोधाभासी आणि असंवेदनशील भूमिका आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यामागे युक्तिवाद विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याचा विचार: परीक्षेच्या दडपणात रक्षाबंधन साजरा न करता अनेक उमेदवार मानसिक तणावात जातील.कौटुंबिक सलोख्याला तडा: बहिणींसोबतचा रक्षाबंधनाचा क्षण गमावणे आयुष्यभर सल देणारे ठरू शकते.भावनांचा अपमान हे केवळ एक शैक्षणिक मुद्दा नसून, धार्मिक आणि सामाजिक भावना जपण्याचाही विषय आहे.

गैरव्यवस्थापनाचा संशय: जाणूनबुजून धार्मिक सणांवर परीक्षा ठेवून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा हा प्रकार नियोजनाचा भाग तर नाही ना? याची चौकशी व्हावी.

सरकारचे दुटप्पी धोरण उघड

हिंदुत्वाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणारे सरकार स्वतःच्या कृतीत मात्र हिंदू सणांना दुय्यम स्थान देत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. आम्ही विचारतो सणाच्या दिवशी परीक्षा घेण्याची इतकी काय घाई होती? हे सरकारला विचारल्याशिवाय राहवत नाही की, विद्यार्थ्यांपेक्षा मोठं अजेंडा तुम्हाला वाटतंय का?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही भारत सरकार व संबंधित परीक्षा प्राधिकरणाला कळकळीची विनंती करतो की “रक्षाबंधनाच्या दिवशी आयोजित केलेली ‘ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट परीक्षा’ त्वरित पुढे ढकलावी,”आणि हिंदू भावनांचा आदर राखून भविष्यात कोणत्याही धार्मिक सणाच्या दिवशी परीक्षा आयोजित करू नये.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

9 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

10 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago