पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.”
त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो नागरिक अडकले आहेत. “इतक्या मोठ्या संकटाच्या वेळी सरकारकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा आपत्कालीन आराखडा नाही, हेच या तथाकथित विकासाचे खरे चित्र आहे,” सपकाळ यांनी म्हटले.
संपूर्ण ट्विटमध्ये त्यांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली सुरू असलेली लूट, निकृष्ट कामे आणि नियोजनाचा अभाव याचा गंभीर उल्लेख करत सरकारवर “ना जबाबदारी, ना संवेदनशीलता, ना उत्तरदायित्व हाच का तुमचा ‘विकास’?” असे सवाल उपस्थित केला.
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…