नांदणी: नांदणीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नंदा पोळ यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नोकरी मिळाली आहे. या निवडीमुळे त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.
नंदा पोळ या मूळच्या नांदणीच्या असून, त्यांच्या कुटुंबाचा फारसा राजकीय इतिहास नाही. त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीत अर्ज भरला होता; मात्र, ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. रत्नाप्पा कुंभार यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.त्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि नांदणी गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव राहिला. कै. कुंभार यांनी पोळ कुटुंबाला अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आणि काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदा पोळ विजयी ठरल्या आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली.
अध्यक्षपदाचा कालावधी जरी फक्त एक वर्षाचा होता, तरी नंदा पोळ यांनी या काळात वेतन आयोगाची तयारी, अंगणवाडीसाठी नवीन इमारती, समाज मंदिरे आणि शाळांच्या इमारतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महिला नेतृत्व किती परिणामकारक ठरू शकते हे प्रत्यक्षातून दाखवून दिले.एक वर्षानंतर अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत त्यांनी पद सोडले, पण राजकारणापासून दूर राहूनही त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची छाप कायम ठेवली. नंदा पोळ यांच्या निवडीमुळे राजकारणात एक पाऊल मागे घेतल्यावर पुढची संधी किती मोठी असू शकते, हे पुन्हा एकदा दिसून आले.
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…