बांदल व गावडेंच्या भेटीने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान
शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चाललेले असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील राजकारणातील जादुगार समजल्या जाणाऱ्या मंगलदास बांदल यांचे पुतणे युवा नेते निखील बांदल यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान आले आहे.
शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना सदर घडामोडी घडवण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचा मोठा हात आहे. काही कारणास्तव बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असल्याने तालुक्यातील राजकारण सोपे झालेले होते. नुकतेच मंगलदास बांदल कारागृहातून बाहेर पडून मैदानात देखील उतरले असताना त्यांचा पुतण्या असलेला निखील बांदल त्यांची सावली बनून त्यांच्या सोबत आहे. सध्या मंगलदास बांदल कोणत्याही पक्षात असल्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप कोणाला समजलेले नसताना राष्ट्रवादीशी त्यांचे काही प्रमाणात वैर असल्याचे उघड आहे.
परंतु शिरुर तालुक्यातील राजकारणातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांची नुकतीच युवा नेते निखील बांदल यांनी भेट घेतली असताना गावडे कुटुंबियांच्या वतीने निखील यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. मात्र त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क बोलले जात असून निखील बांदल व पोपटराव गावडे यांच्यातील भेटीने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेंना उधान आले असून यापुढील काळात शिरुर तालुक्यातील राजकारणात काय घडामोड होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टाकळी हाजी भागातून मी जात असताना काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोपटराव गावडे साहेबाची व माझी भेट झाली असून शिरुर तालुक्यातील राजकारणासह दोन वर्षात घडलेल्या विविध घडामोडीबाबत आमची चर्चा झाली असल्याचे याबाबत बोलताना युवा नेते निखील बांदल यांनी सांगितले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…
मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…