संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ७ जुलै महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात महामार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
तसेच सिडको हद्दीतील झालर क्षेत्रातील लहान मोठी २६ गावे याप्राधिकरणात सामावून घेण्यात आली आहेत. या भागातील अतिक्रमणे पाडली आणार आहेत.
या गावांचा समावेश
सातारा-देवळाई (मनपा हद्दीत)
बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सहजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर (प्राधिकरणाकडे वर्ग झालेली)
प्राधिकरणाकडील तालुकानिहाय गावे
छत्रपती संभाजीनगर: १४३
गंगापूर: ६७
फुलंब्री: १९
खुलताबाद: ४१
पैठण: ४३
झालर क्षेत्र: २६
एकूण: ३४२ गावे
आठ दिवसांत कारवाईचे अल्टीमेटम
अंदाजे १५,००० अनधिकृत बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमित न झाल्यास, त्यावर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. जालना रोड, समृद्धी महामार्ग आणि झालर क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची मदत घेतली जाईल. आठ दिवसांत अतिक्रमणे नियमित न झाल्यास प्राधिकरण स्वतः कारवाई करणार आहे.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…