महाराष्ट्र

लोकसभेतील फक्त दोन खासदारांनी नाकारला पगार

नवी दिल्ली: खासदारांना मिळणारा पगार आणि विविध भत्त्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा या विषयावर वेगवेगळ्या पक्षांतील खासदार पक्षभेद विसरून एकत्र येताना दिसतात. मात्र सध्याच्या लोकसभेत याला अपवाद ठरतील असे दोन खासदार आहेत. त्यांनी खासदार म्हणून मिळणारा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेत केवळ दोन खासदारांनी आपला पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपचे कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल आणि काँग्रेसचे इनर मणिपूरचे खासदार बिमोल अकोजाम यांचा समावेश आहे.

या दोन्ही खासदारांचे मतदारसंघही भौगोलिकदृष्ट्या खूप दूर आहेत. हरियाणातील कुरुक्षेत्र ते मणिपूरमधील इंफाळ या दोन मतदारसंघांमध्ये सुमारे २५७५ किलोमीटरचे अंतर आहे. विशेष म्हणजे, नवीन जिंदाल यांनी केवळ पगारच नाही तर खासदारांना मिळणारे सरकारी भत्ते आणि इतर सोयी-सुविधा देखील न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा सचिवालयाकडून आरटीआय अंतर्गत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेतील ४८१ सदस्य नियमितपणे पगार घेत आहेत. लोकसभेत एकूण ५४३ जागा असून त्यापैकी दोन जागा सध्या रिक्त आहेत. पगार घेणाऱ्यांच्या यादीत नसलेल्या उर्वरित खासदारांची स्थिती मात्र या उत्तरात स्पष्ट करण्यात आलेली नाही.

आर्थिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने या दोन्ही खासदारांमध्ये मोठा फरक आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार नवीन जिंदाल यांनी सुमारे १२४१ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, तर बिमोल अकोइजाम यांनी सुमारे ९७ लाख रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे.

लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदाराचा मान मात्र गुंटूरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ५७०५ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या पाठोपाठ चेवेल्लाचे खासदार कोंडा विशवेश्वर रेड्डी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर ४५६८ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे.

आरटीआयमधून समोर आलेल्या या माहितीनंतर संसदेतील खासदारांच्या पगार आणि भत्त्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago