तरनतारन (पंजाब): दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पंजाबमधील तरनतारन शहरात खळबळ उडाली आहे. दानिका (९) आणि आरव (६) या भावंडांचे रविवारी सकाळी त्यांच्या घरातील बिछान्यावर मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांनी फास्ट फूड खाल्ले होते. मुलांच्या हट्टामुळे वडील विशाल कुमार यांनी घराजवळील फास्ट फूड स्टॉलवरून सोया चाप आणि मोमोज मागवले होते. फास्ट फूड खाल्ल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांकडून आणलेले औषध दिले. औषध घेतल्यानंतर दोन्ही मुले झोपली.
रविवारी सकाळी कुटुंबीयांनी मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी दोघांचेही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मुलांचे मृतदेह काळे-निळे पडलेले असल्याचेही आढळून आले.
या घटनेनंतर पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात पोलिसांनी काही संशय व्यक्त केला आहे. मुलांनी जेवलेले अन्नच कारण असते तर त्यांची आई नेहा यांनी तेच अन्न खाल्ले असूनही त्यांची प्रकृती कशी स्थिर आहे, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे विषप्रयोग किंवा श्वास कोंडला गेल्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, विशाल कुमार हे गेल्या २० वर्षांपासून त्या परिसरात राहत असून ते फळांचा रस विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना निखिल नावाचा मुलगा आहे, जो सध्या सिंगापूरमध्ये राहतो. सुमारे ११ वर्षांपूर्वी विशाल यांनी नेहा यांच्याशी दुसरे लग्न केले होते. या दांपत्याला दानिका आणि आरव अशी दोन मुले होती. अलीकडे विशाल यांचा व्यवसाय मंदावल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…