रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप केला.

शिंदे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी पित्याच्या वचनासाठी १४ वर्षांचा वनवास पत्करला, मात्र ज्यांनी स्वतःच्या वडिलांचे विचारच सोडले त्यांना श्रीरामांच्या आदर्शांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे आंदोलन रामरक्षेसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या रक्षणासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.

रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण देण्यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांना बोलवावे, त्यानंतरच RSS प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले आणि कलम ३७० हटवण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी या निर्णयांचे स्वागत केले असते, असे सांगत शिंदे यांनी उबाठाच्या नेतृत्वावर मोदी आणि अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करण्याचा आरोप केला.

२०१९ मध्ये सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली असून महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत त्यांना त्याचे उत्तर दिले, असा दावाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत