jalinder-bhadale
पुणे : पारगाव (ता. दौंड) येथे ऊसाच्या शेतातील पाचट जाळताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऊसाचे पाचट पेटवताना आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याला त्या आगीतून बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला आहे.
जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (ता. 22) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालिंदर भाडळे यांनी आपल्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाल्यानंतर उरलेले पाचट नष्ट करण्यासाठी आग लावली होती. मात्र, त्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक वाढल्याने आगीने क्षणातच उग्र स्वरूप धारण केले. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण शेत व्यापले आणि भाडळे यांना चारही बाजूंनी वेढा घातला. धुराचे मोठे लोट आणि वाढत्या आगीमुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलता आले नाही. घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी भाडळे गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे पारगाव परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू…
समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…
पुण्यात मित्रमंडळ चौकात भीषण अपघात, तरुणाचा होरपळून मृत्यू
नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…