महाराष्ट्र

अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा रंगली असून, या बजेटमध्ये मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. त्या विश्व मराठी संमेलन २०२५ च्या कार्यक्रमात बोलत होत्या.

१२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त – सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा

“या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक सुट मिळणार असून, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना याचा लाभ होईल” असेही याप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

आरोग्य क्षेत्रावर भर– कॅन्सर आणि दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होणार

पुढे बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कॅन्सरसह अन्य दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात होणाऱ्या औषधांबरोबरच देशांतर्गत उत्पादनांवरही सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील.

महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा- सरकारचा प्रगतीकडे भर

महिला बचत गटांसाठी सुरू असलेल्या ‘लखपती दीदी’सारख्या योजनांना अर्थसंकल्पात पाठिंबा मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच, महाराष्ट्रात शहरांचा चेहरा बदलत असून, दळणवळण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. मुंबईतील अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग यांसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी शहरांचा विकास वेगाने होत असल्याचे सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील टीका अयोग्य; डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. “राष्ट्रपती आदिवासी समाजातील असून, त्यांच्याबद्दल अशा प्रकारची टीका करणे अयोग्य आहे,” असे त्या म्हणाल्या. अर्थसंकल्प २०२५ हा सर्वसमावेशक असून, त्याचा लाभ मध्यमवर्ग, महिला आणि आरोग्य क्षेत्राला होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…

6 मिनिटे ago

खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप

मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…

11 मिनिटे ago

RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…

13 मिनिटे ago

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…

19 मिनिटे ago

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…

23 मिनिटे ago

अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…

26 मिनिटे ago