मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मातेले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “नाव बदलण्याच्या राजकारणाने जनता कंटाळली आहे. केवळ ‘के.ई.एम.’चा फलक बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ केल्याने रुग्णांच्या समस्या सुटणार आहेत का?” त्यांनी रुग्णालयातील बेड्सची कमतरता, डॉक्टर व नर्सची अपुरी संख्या आणि औषधांचा तुटवडा यांसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले.“नाव बदलून लौकिक मिळत नाही, कामगिरीतून मिळतो. लोकांना उपचार हवेत, फलकावरील शब्द नाहीत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारला आव्हान देत मातेले म्हणाले की, “राज्याचे पालकमंत्री म्हणून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अत्याधुनिक आणि सुसज्ज नवीन रुग्णालय उभारून दाखवा. त्या रुग्णालयाला कोणतेही नाव द्या, आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आपला सत्कार करू.”दरम्यान, त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, “दिखावू निर्णयांनी जनतेची दिशाभूल करू नका. मुंबईकरांना घोषणांचा नाही, तर ठोस कृतीचा इलाज हवा आहे.”
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…