महाराष्ट्र

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका

मुंबई: पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही हल्लेखोरांना शिक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले.

तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारत, “पाहलगाम हल्ल्याचा सूत्रधार साजिद जाट याला फाशी कधी देणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. हल्ल्यातील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ४० मिनिटांच्या दूरध्वनी संभाषणाचा उपयोग पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी का करण्यात आला नाही. जाटचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी अशा चर्चांचा ठोस परिणाम दिसायला हवा होता, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर केवळ चर्चा होऊन प्रत्यक्ष कृती न होणे, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे तपासे यांनी सांगितले.

दरम्यान, नारीशक्ती वंदन अधिनियमावरून भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करून महिला आरक्षणाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच, महिला आरक्षण विधेयकाच्या आडून संसद सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत, इंडिया आघाडीने हा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा तपासे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

11 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

15 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

20 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

27 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago