पुणे: महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांची प्रमुख कुस्ती रंगली होती. या लढतीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दीड तास रंगली तगडी झुंज
१७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही मल्लांमध्ये जवळपास दीड तास चुरशीची झुंज पाहायला मिळाली. कुस्ती सुटत नसल्याने दोघेही दमलेले दिसत होते. दरम्यान, सामन्यात माऊली कोकाटे यांनी सिकंदरला कानठाळी दिल्याचा प्रकार घडला. त्यावर सिकंदरने त्यांना ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा कानठाळी दिल्याने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली.
समर्थकाचा आखाड्यात प्रवेश; सामना थांबवला
वाद वाढत असतानाच कोकाटे यांचा एक समर्थक थेट आखाड्यात उतरला आणि सिकंदरवर हात उचलल्याचा प्रकार घडला. यामुळे वातावरण तापले. पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करत सामना काही काळ थांबवला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला; मात्र अखेर निकाल न लागल्याने दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आले.
“आमची बॉडी गरम होती” – सिकंदर शेख
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिकंदर शेख यांनी सौम्य भूमिका घेतली. “आमच्यात जे झालं ते रागारागात झालं. आम्ही कुस्तीत होतो, आमची बॉडी गरम होती. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. कोकाटेसोबत एक मुलगा होता, तो माझ्यावर धावून आला. बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे; पण हा फार मोठा विषय नाही,” असे सिकंदर यांनी स्पष्ट केले.
मल्ल म्हणून सन्मान कायम
शांत स्वभाव आणि उत्कृष्ट तंत्रासाठी ओळखले जाणारे सिकंदर शेख यांनी यावेळीही माऊली कोकाटे यांचा मल्ल म्हणून सन्मान राखल्याचे दिसून आले. मात्र, बाहेरून समर्थकांनी आखाड्यात घुसून हस्तक्षेप करणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये रंगली आहे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने रंगलेल्या या ११ लाखांच्या कुस्तीपेक्षा सामन्यातील वाद अधिक चर्चेत राहिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…