महाराष्ट्र

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’, सक्षम युवक, सक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे कौशल्य विकास सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी दिली आहे.

खासदार वर्षा गायकवाड, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध मान्यवर त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, उद्योजक, विविध शासकीय संस्था तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे कौशल्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना जवळच्या आस्थापना व उद्योजकांकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago