महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत लोकप्रिय झाले होते. मात्र पत्रकारितेचे आकर्षण असल्याने त्यांनी ही नोकरी सोडून पत्रकारितेत प्रवेश केला.

‘श्री’ या साप्ताहिकातून पत्रकारितेची सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुंबई संध्या, सामना, लोकनायक आणि पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकांमध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम केले. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील मंत्री, आमदार आणि पक्षप्रमुखांशीही त्यांनी आपल्या स्वभावामुळे वेगळी छाप पाडली होती.

अलीकडच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते. आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ७ वाजता कुर्ला येथील सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्ययात्रेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले , खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह विविध सामाजिक-राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच अनेक दैनिकांचे पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येत्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago