मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत लोकप्रिय झाले होते. मात्र पत्रकारितेचे आकर्षण असल्याने त्यांनी ही नोकरी सोडून पत्रकारितेत प्रवेश केला.
‘श्री’ या साप्ताहिकातून पत्रकारितेची सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुंबई संध्या, सामना, लोकनायक आणि पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकांमध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम केले. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील मंत्री, आमदार आणि पक्षप्रमुखांशीही त्यांनी आपल्या स्वभावामुळे वेगळी छाप पाडली होती.
अलीकडच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते. आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ७ वाजता कुर्ला येथील सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले , खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह विविध सामाजिक-राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच अनेक दैनिकांचे पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येत्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…