महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती 

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आज नवी दिल्ली येथे शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

शिवराज मोरे यांनी महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआई पासून राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. एनएसयूआईचे दोन वेळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे निवडून येण्याचा विक्रम केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच एनएसयूआईचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यांनी ८-९ राज्यांमध्ये संघटन विस्ताराचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव, उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि राज्यभर युवकांचे मजबूत संघटन उभे केले.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील सागर साळुंखे गेल्या काही वर्षांपासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.

या नियुक्तीनंतर बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचे संघटन करून त्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस आंदोलन उभारले जाईल. शिक्षण, नोकरी, आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवर युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आम्ही लढा उभारू. केंद्र आणि राज्यातील भाजपा युती सरकार युवकविरोधी असून, त्यांच्या अन्यायकारक धोरणांचा निर्णायक विरोध करण्यासाठी युवक काँग्रेस कटिबद्ध आहे. तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निर्धारपूर्वक काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो आपण सार्थ करू असे मोरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

47 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago