महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती 

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आज नवी दिल्ली येथे शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

शिवराज मोरे यांनी महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआई पासून राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. एनएसयूआईचे दोन वेळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे निवडून येण्याचा विक्रम केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच एनएसयूआईचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यांनी ८-९ राज्यांमध्ये संघटन विस्ताराचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव, उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि राज्यभर युवकांचे मजबूत संघटन उभे केले.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील सागर साळुंखे गेल्या काही वर्षांपासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.

या नियुक्तीनंतर बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचे संघटन करून त्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस आंदोलन उभारले जाईल. शिक्षण, नोकरी, आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवर युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आम्ही लढा उभारू. केंद्र आणि राज्यातील भाजपा युती सरकार युवकविरोधी असून, त्यांच्या अन्यायकारक धोरणांचा निर्णायक विरोध करण्यासाठी युवक काँग्रेस कटिबद्ध आहे. तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निर्धारपूर्वक काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो आपण सार्थ करू असे मोरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

5 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

10 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

11 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

11 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

11 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago