महाराष्ट्र

पाणंद आणि शेतरस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय! बाजूची ६+६ फूट जागा घेऊन बनवणार १२ फूट रस्ता

संभाजीनगर: ग्रामीण भागातील शेतरस्त्यांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसतो, तर काही वेळेस इतर शेतकऱ्यांकडून रस्त्यावर अडथळा निर्माण केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

📅 *३ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार नवा नियम*

या निर्णयानुसार, जेथे शेतरस्त्यांची गरज आहे तिथे दोन्ही बाजूंनी ६-६ फूट जागा घेऊन १२ फूट रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावून त्याचे सीमांकन कायमस्वरूपी केले जाईल.

मोफत मोजणी व पोलीस बंदोबस्त

शेतमालकांना आता रस्त्याची मोजणी मोफत करून मिळणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा विनामूल्य दिला जाणार आहे.

चुकीचा रस्ता घेतल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

कोणताही अधिकारी जर शेताच्या मधोमध रस्ता नेईल, तर त्याच्या वेतनवाढीवर बंदी घालण्यात येणार आहे.

रस्ता हा केवळ बांधावरूनच जावा, असा स्पष्ट नियम करण्यात आला आहे.

प्रत्येक शेती रस्त्याला मिळणार क्रमांक

ज्या पद्धतीने महामार्गांना आणि जिल्हा रस्त्यांना क्रमांक असतो, त्याच पद्धतीने आता *पाणंद आणि शेती रस्त्यांनाही* क्रमांक दिला जाणार आहे.

उद्दिष्ट: ५ वर्षांत सर्व वाद मिटवणे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की, _”पुढील पाच वर्षांत एकही शेती रस्ता वादात राहणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत.”_

३ ऑगस्ट रोजी मोठा उपक्रम

शेतरस्त्यांची मोजणी सुरू होणार

रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावण्यात येणार

योग्य रस्ता निश्चित केला जाणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

13 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

15 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

20 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

20 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

20 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

20 तास ago