महाराष्ट्र

पाणंद आणि शेतरस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय! बाजूची ६+६ फूट जागा घेऊन बनवणार १२ फूट रस्ता

संभाजीनगर: ग्रामीण भागातील शेतरस्त्यांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसतो, तर काही वेळेस इतर शेतकऱ्यांकडून रस्त्यावर अडथळा निर्माण केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

📅 *३ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार नवा नियम*

या निर्णयानुसार, जेथे शेतरस्त्यांची गरज आहे तिथे दोन्ही बाजूंनी ६-६ फूट जागा घेऊन १२ फूट रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावून त्याचे सीमांकन कायमस्वरूपी केले जाईल.

मोफत मोजणी व पोलीस बंदोबस्त

शेतमालकांना आता रस्त्याची मोजणी मोफत करून मिळणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा विनामूल्य दिला जाणार आहे.

चुकीचा रस्ता घेतल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

कोणताही अधिकारी जर शेताच्या मधोमध रस्ता नेईल, तर त्याच्या वेतनवाढीवर बंदी घालण्यात येणार आहे.

रस्ता हा केवळ बांधावरूनच जावा, असा स्पष्ट नियम करण्यात आला आहे.

प्रत्येक शेती रस्त्याला मिळणार क्रमांक

ज्या पद्धतीने महामार्गांना आणि जिल्हा रस्त्यांना क्रमांक असतो, त्याच पद्धतीने आता *पाणंद आणि शेती रस्त्यांनाही* क्रमांक दिला जाणार आहे.

उद्दिष्ट: ५ वर्षांत सर्व वाद मिटवणे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की, _”पुढील पाच वर्षांत एकही शेती रस्ता वादात राहणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत.”_

३ ऑगस्ट रोजी मोठा उपक्रम

शेतरस्त्यांची मोजणी सुरू होणार

रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावण्यात येणार

योग्य रस्ता निश्चित केला जाणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

6 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

6 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

6 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

6 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

6 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

7 तास ago