महाराष्ट्र

धक्कादायक! पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून अन पुढे…

नाशिक: निफाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. याच पुराच्या एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली.

अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय १७) हिचे वडील विजय गायकवाड काकासाहेब नगर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करत आहेत. आपल्या वडीलांच्या शाळेत आपण महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे म्हणून ती जवळच असलेल्या शिवडी ता. निफाड येथील बापू क्षीरसागर व शंकर क्षीरसागर येथे मामाकडे राहुन स्कुटीवरुन ये-जा करत महाविद्यालयिन शिक्षण घेत होती.

दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आला होता. सोमवार (दि. 19) रोजी सकाळी ७ वाजता उगाव- खेडे या दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी सुरु होते. पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तिथेच घात झाला.

पुराच्या पाण्यात स्कुटी टाकताच, तन्वी वाहून गेली. परिसरातील नागरिकांनी तिला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नागरिकांनी तन्वीचा शोध घेतला. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

46 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago