महाराष्ट्र

टाळ्यांच्या कडकडाटात श्री. एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दिले धन्यवाद

मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी टाळ्यांच्या कडकडाटात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे स्मरण केले. तसेच भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर शपथेपूर्वी राज्यातील १३ कोटी जनतेचे श्री. शिंदे यांनी आवर्जून आभार मानले. मुंबईतील आझाद मैदानात पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह प्रमुख केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले होते. महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाची श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी श्री.एकनाथ शिंदे आणि श्री.अजित पवार यांनी आज शपथ घेतली. श्री.एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अडीच वर्षात जनहिताच्या योजना राबवणाऱ्या श्री. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आजच्या शपथविधी कार्यक्रमातून दिसून आली. श्री. शिंदे यांनी शपथ घेताना हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले. तसेच मागील अडीच वर्ष भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले.

शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, पक्षाच्या सर्व आमदार आणि माजी मंत्र्यांच्या वतीने श्री. एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करण्यात आला. श्री. शिंदे यांनी सुरु केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी कळकळीची विनंती केली होती, ती विनंती श्री. शिंदे यांनी मान्य केली. सामंत पुढे म्हणाले की, हिंदुत्व हा महायुतीचा पाया आहे. एक जबाबदार घटक पक्ष म्हणून आम्ही जनतेच्या जनादेशाचा आदर करतो. शिवसनेने महायुतीचा धर्म पाळला आणि महाराष्ट्राला स्थिर आणि प्रभावी सरकार देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे सामंत म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नागरिकांच्या आकांक्षा जाणतो आणि प्रत्येकासाठी सुशासन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे वचन देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जनतेसाठी माझे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि मी समाजातील सर्व घटकांची अटळ समर्पण आणि उत्कटतेने सेवा करत राहीन. माझ्यासाठी, सार्वजनिक सेवा कोणत्याही पद किंवा पदापेक्षा जास्त आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमच्या सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

6 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

6 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

6 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

6 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

6 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

15 तास ago