महाराष्ट्र

सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीनला अधिक मागणी दिसून येत आहे.

मात्र काढणीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान केल्याने सध्या बाजारात आवक कमी आहे. याचाच फायदा घेत सुरुवातीला कमी किमतीत सोयाबीन खरेदी करून साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी आता भाववाढ होताच साठवलेला माल विक्रीस काढण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बाजारात नवीन हंगामातील तुरीची आवक सुरू झाली असून तुरीच्या दरातही तेजी आहे. सध्या नवीन तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी ८ हजार ९०० रुपयांपर्यंत गेलेले तुरीचे दर आता स्थिरावले असले तरी यंदा तुरीला चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.

सोयाबीनच्या दरात तेजी असूनही आवक कमी असल्याने, साठवणूक केलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांना आणखी भाववाढीची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली आहे.

ओमकार नावडे, भुसार व्यापारी, कळमनुरी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

13 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

13 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

14 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

14 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

15 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

15 तास ago