महाराष्ट्र

सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीनला अधिक मागणी दिसून येत आहे.

मात्र काढणीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान केल्याने सध्या बाजारात आवक कमी आहे. याचाच फायदा घेत सुरुवातीला कमी किमतीत सोयाबीन खरेदी करून साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी आता भाववाढ होताच साठवलेला माल विक्रीस काढण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बाजारात नवीन हंगामातील तुरीची आवक सुरू झाली असून तुरीच्या दरातही तेजी आहे. सध्या नवीन तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी ८ हजार ९०० रुपयांपर्यंत गेलेले तुरीचे दर आता स्थिरावले असले तरी यंदा तुरीला चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.

सोयाबीनच्या दरात तेजी असूनही आवक कमी असल्याने, साठवणूक केलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांना आणखी भाववाढीची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली आहे.

ओमकार नावडे, भुसार व्यापारी, कळमनुरी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

10 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

10 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

10 तास ago