महाराष्ट्र

सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीनला अधिक मागणी दिसून येत आहे.

मात्र काढणीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान केल्याने सध्या बाजारात आवक कमी आहे. याचाच फायदा घेत सुरुवातीला कमी किमतीत सोयाबीन खरेदी करून साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी आता भाववाढ होताच साठवलेला माल विक्रीस काढण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बाजारात नवीन हंगामातील तुरीची आवक सुरू झाली असून तुरीच्या दरातही तेजी आहे. सध्या नवीन तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी ८ हजार ९०० रुपयांपर्यंत गेलेले तुरीचे दर आता स्थिरावले असले तरी यंदा तुरीला चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.

सोयाबीनच्या दरात तेजी असूनही आवक कमी असल्याने, साठवणूक केलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांना आणखी भाववाढीची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली आहे.

ओमकार नावडे, भुसार व्यापारी, कळमनुरी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago