महाराष्ट्र

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.

घोषणा कोणी केली

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

आता फक्त साधा कागद पुरेसा

यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त स्वसाक्षांकित अर्ज लिहून संबंधित तहसील कार्यालयात सादर करा, आणि तुम्हाला आवश्यक ते प्रमाणपत्र मिळेल.

कोणाला होणार फायदा

दहावी आणि बारावी नंतर प्रमाणपत्रासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना

अनेक दाखले लागणाऱ्या पालकांना

शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना

त्वरित अंमलबजावणी

पूर्वी नव्या सरकारने हे शुल्क १०० वरून ५०० रुपये केले होते, मात्र यामुळे सामान्यांना आर्थिक बोजा वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला. आता नवीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

पालक आणि विद्यार्थी म्हणतात, “आता खर्च वाचणार! साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले सहज मिळतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

8 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

8 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

8 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

8 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

8 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

8 तास ago