महाराष्ट्र

दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; अमित शाह यांची भेट, विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

दिल्लीतील या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील काही नेत्यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली असून, हेच अजित पवार यांची इच्छा होती, असा दावा केला जात आहे.सध्या हा मुद्दा सार्वजनिक पातळीवर शांत असला तरी, सुनेत्रा पवार कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीत विलिनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.

राज्यसभा राजीनामा आणि पुढील रणनीती

सुनेत्रा पवार या सक्रिय राज्य राजकारणात येण्यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून कोणाला संधी दिली जाणार, याबाबतही पक्षांतर्गत चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपाची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे संभाव्य विलिनीकरण झाल्यास सत्ताधारी भाजपाशी चर्चा अपरिहार्य मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाजपाला माहिती देणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही वरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

2 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

20 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago