महाराष्ट्र

लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे पुण्यात भीषण अपघातातून चालकाचे प्राण वाचले

कारमधील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षित

पुणे: पुणे शहरात माणुसकी, धैर्य आणि कर्तव्यभावनेचं दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाल्यात कोसळलेल्या कारमधील चालकाचे प्राण लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जीव वाचवला नाही तर कारमध्ये असलेली लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे चालकाकडे सुपूर्द केली.

वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर सोमवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकून पडला होता.

याचवेळी लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव पुलावरून जात होते. रस्त्यावर झालेली गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. चौकशी केली असता खाली नाल्यात कार कोसळल्याची माहिती मिळाली. कारमध्ये हालचाल दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट नाल्यात उतरून मदतकार्य सुरू केले.

कारमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत होता आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. यादव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारची काच फोडून चालकाला बाहेर काढले. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत त्यांनी स्वतःच्या रुमालाने नाकावर दाब देऊन रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी चालकाला नाल्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.

अपघातग्रस्त कारमध्ये सुमारे १ ते १.५ लाख रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले. चालक शुद्धीवर आल्यानंतर आशिष कुमार यादव यांनी संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे त्याच्याकडे सुपूर्द केली. नंतर एका टेम्पोच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.लष्करी अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धैर्य, माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

6 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago