मनोरंजन

बिग बॉस मराठी! ‘पॉवर की’ टास्कमध्ये रुचिताची जीभ घसरली; दीपालीसोबत वाद विकोपाला

 

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.

सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावलं होतं. असं असतानाच पुन्हा एकदा टास्कदरम्यान रुचिताचं आक्रमक वर्तन समोर आलं आहे.

‘पॉवर की’ टास्कमध्ये तणाव

बिग बॉसने ‘पॉवर की’ मिळवण्यासाठी खास टास्क दिला होता. या टास्कमध्ये जोड्यांना निळी, पिवळी आणि गुलाबी रंगाची चावी पकडायची होती. संचालक ज्या जोडीकडे चावी नसेल, त्या जोडीला बाद करत होता. बाद झालेल्या जोड्या पुढे इतर जोड्यांना बाद करत होत्या.

या टास्कदरम्यान रुचिता–तन्वी आणि दीपाली–दिव्या या दोन्ही जोड्यांनी एकाच चावीवर पकड घेतली. यावेळी दीपाली चावी पूर्णपणे स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असताना रुचितानं आक्रमक भाषा वापरली. “लाथ बसली ना तर गुडघा धरून पळाल,” असा इशारा तिनं दिल्याने वातावरण अधिकच तापलं.

दीपाली–रुचिता वाद विकोपाला

वाद वाढत असताना दीपालीनं रुचिताचा पाय खेचला. त्यावरून दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. रुचितानं दीपालीसाठी वापरलेले शब्द प्रेक्षकांना धक्कादायक वाटले. “मी बिग बॉसमध्ये असेपर्यंत हिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार,” अशा धमकीवजा वक्तव्यामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं.या संपूर्ण गोंधळात अखेर ‘पॉवर की’ विशाल आणि ओमकार यांच्या जोडीला मिळाली.

भाऊच्या धक्क्यावर पुन्हा कारवाई होणार?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वादानंतर जान्हवीच्या वक्तव्यांवर कठोर भूमिका घेण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता रुचिताच्या वागणुकीवर रितेश देशमुख काय भूमिका घेतात, तिला पुन्हा भाऊच्या धक्क्यावर धारेवर धरलं जातं का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

8 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

16 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

17 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

18 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

22 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

22 तास ago