मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.
सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावलं होतं. असं असतानाच पुन्हा एकदा टास्कदरम्यान रुचिताचं आक्रमक वर्तन समोर आलं आहे.
‘पॉवर की’ टास्कमध्ये तणाव
बिग बॉसने ‘पॉवर की’ मिळवण्यासाठी खास टास्क दिला होता. या टास्कमध्ये जोड्यांना निळी, पिवळी आणि गुलाबी रंगाची चावी पकडायची होती. संचालक ज्या जोडीकडे चावी नसेल, त्या जोडीला बाद करत होता. बाद झालेल्या जोड्या पुढे इतर जोड्यांना बाद करत होत्या.
या टास्कदरम्यान रुचिता–तन्वी आणि दीपाली–दिव्या या दोन्ही जोड्यांनी एकाच चावीवर पकड घेतली. यावेळी दीपाली चावी पूर्णपणे स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असताना रुचितानं आक्रमक भाषा वापरली. “लाथ बसली ना तर गुडघा धरून पळाल,” असा इशारा तिनं दिल्याने वातावरण अधिकच तापलं.
दीपाली–रुचिता वाद विकोपाला
वाद वाढत असताना दीपालीनं रुचिताचा पाय खेचला. त्यावरून दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. रुचितानं दीपालीसाठी वापरलेले शब्द प्रेक्षकांना धक्कादायक वाटले. “मी बिग बॉसमध्ये असेपर्यंत हिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार,” अशा धमकीवजा वक्तव्यामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं.या संपूर्ण गोंधळात अखेर ‘पॉवर की’ विशाल आणि ओमकार यांच्या जोडीला मिळाली.
भाऊच्या धक्क्यावर पुन्हा कारवाई होणार?
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वादानंतर जान्हवीच्या वक्तव्यांवर कठोर भूमिका घेण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता रुचिताच्या वागणुकीवर रितेश देशमुख काय भूमिका घेतात, तिला पुन्हा भाऊच्या धक्क्यावर धारेवर धरलं जातं का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…