पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले.
पोलीस संचलन मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच इतर पोलीस अधिकारी, नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण वंदन केले. तसेच गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही अभिवादन केले.
शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, आरोग्य, पायाभूत सुविधा, आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून, हे शहर देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती आणि धार्मिक स्वातंत्र्य दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे, असे ते म्हणाले.
सोहळ्यात विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एसआरपीएफ गट क्र. १ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे यांचा समावेश होता.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘स्वच्छ पुणे संकल्प-2026’ प्रचार रथाचे उद्घाटन केले. या उपक्रमांतर्गत कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…