पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले.
पोलीस संचलन मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच इतर पोलीस अधिकारी, नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण वंदन केले. तसेच गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही अभिवादन केले.
शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, आरोग्य, पायाभूत सुविधा, आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून, हे शहर देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती आणि धार्मिक स्वातंत्र्य दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे, असे ते म्हणाले.
सोहळ्यात विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एसआरपीएफ गट क्र. १ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे यांचा समावेश होता.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘स्वच्छ पुणे संकल्प-2026’ प्रचार रथाचे उद्घाटन केले. या उपक्रमांतर्गत कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…