महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने उचलली कडक पावले

संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी निलंबनाची मुख्यमंत्र्याकडून घोषणा

मुंबई: विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचार प्रकरणी आज विधान परिषद सभागृहात चर्चा करण्यात आली.

सदरील वसतिगृहाच्या मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावणे अत्यंत चीड आणणारे आहे. जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याशी संबंधित हे प्रकरण असून बाल कल्याण समिती अर्ध न्यायिक असल्याने तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे दानवे म्हणाले.

जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याकडे संबंधित घटने प्रकरणी आतापर्यंत दहा तक्रार अर्ज करण्यात आले होते. मात्र त्यांनी या तक्रार अर्जांकडे दुर्लक्ष केले असल्याने जिल्हा बाल विकास अधिकारी या प्रकरणी जबाबदार असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याची गंभीर दखल घेतली. तसेच पोलिस प्रशासन आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना केली.

मात्र हे प्रकरण समोर येण्यापूर्वी राज्याचे महिला आयोग काय करत होते का ? अशा शब्दांत दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सदरील वस्तीगृह चालवणारी संस्था धर्मांतरण करण्याचे कार्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत संस्थेचा मान्यताप्राप्त कालावधी संपल्याची माहितीही सभागृहाला दिली. सदर वसतिगृहात ८० मुली असून संस्था चालकांना याप्रकरणी कारागृहात टाकण्याची मागणी दानवे यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

5 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

15 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

15 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

20 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

20 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

20 तास ago