महाराष्ट्र

बारामतीचा वाघ अजूनही समर्थ आहे! अजित दादांच्या निधनानंतर शरद पवार रणांगणात

बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार हे शरद पवारांचे केवळ पुतणे नव्हते, तर अनेक वर्षे बारामतीचा कारभार समर्थपणे सांभाळणारे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंब अक्षरशः कोलमडून गेले आहे.

अजित पवार हयात असताना शरद पवारांनी बारामतीच्या प्रशासनिक आणि स्थानिक प्रश्नांपासून जाणीवपूर्वक अंतर राखले होते. काही वर्षांपूर्वी बारामतीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी अजित पवारांकडे सोपवली होती. पाणी, शेती, उद्योग किंवा स्थानिक वाद असोत, शरद पवार थेट हस्तक्षेप करत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी बारामतीत सक्रिय भूमिका घेतली नव्हती, हे विशेष उल्लेखनीय मानले जाते.

मात्र अजित पवारांच्या निधनानंतर हे चित्र बदलताना दिसत आहे. त्यांच्या अस्थीविसर्जनाच्या दिवशी शरद पवार बारामती तालुक्यातील नीरा-वाघज गावात पोहोचले आणि नीरा नदीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी केवळ प्रशासकीय नसून, ती राजकीय आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात या पाहणीला ‘सांकेतिक पाऊल’ मानले जात असून, शरद पवारांनी या माध्यमातून स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीच्या नेतृत्वावरून चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी पुढे यावे, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत असताना, शरद पवारांनी स्वतः मैदानात उतरून आपण अजूनही बारामतीच्या नेतृत्वासाठी सक्षम आणि सज्ज आहोत, हे दाखवून दिल्याची चर्चा आहे.

नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून, बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचा तो संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

9 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

9 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

9 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

9 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

9 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

10 तास ago