महाराष्ट्र

बारामतीचा वाघ अजूनही समर्थ आहे! अजित दादांच्या निधनानंतर शरद पवार रणांगणात

बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार हे शरद पवारांचे केवळ पुतणे नव्हते, तर अनेक वर्षे बारामतीचा कारभार समर्थपणे सांभाळणारे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंब अक्षरशः कोलमडून गेले आहे.

अजित पवार हयात असताना शरद पवारांनी बारामतीच्या प्रशासनिक आणि स्थानिक प्रश्नांपासून जाणीवपूर्वक अंतर राखले होते. काही वर्षांपूर्वी बारामतीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी अजित पवारांकडे सोपवली होती. पाणी, शेती, उद्योग किंवा स्थानिक वाद असोत, शरद पवार थेट हस्तक्षेप करत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी बारामतीत सक्रिय भूमिका घेतली नव्हती, हे विशेष उल्लेखनीय मानले जाते.

मात्र अजित पवारांच्या निधनानंतर हे चित्र बदलताना दिसत आहे. त्यांच्या अस्थीविसर्जनाच्या दिवशी शरद पवार बारामती तालुक्यातील नीरा-वाघज गावात पोहोचले आणि नीरा नदीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी केवळ प्रशासकीय नसून, ती राजकीय आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात या पाहणीला ‘सांकेतिक पाऊल’ मानले जात असून, शरद पवारांनी या माध्यमातून स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीच्या नेतृत्वावरून चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी पुढे यावे, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत असताना, शरद पवारांनी स्वतः मैदानात उतरून आपण अजूनही बारामतीच्या नेतृत्वासाठी सक्षम आणि सज्ज आहोत, हे दाखवून दिल्याची चर्चा आहे.

नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून, बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचा तो संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

7 सेकंद ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

7 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago