बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार हे शरद पवारांचे केवळ पुतणे नव्हते, तर अनेक वर्षे बारामतीचा कारभार समर्थपणे सांभाळणारे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंब अक्षरशः कोलमडून गेले आहे.
अजित पवार हयात असताना शरद पवारांनी बारामतीच्या प्रशासनिक आणि स्थानिक प्रश्नांपासून जाणीवपूर्वक अंतर राखले होते. काही वर्षांपूर्वी बारामतीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी अजित पवारांकडे सोपवली होती. पाणी, शेती, उद्योग किंवा स्थानिक वाद असोत, शरद पवार थेट हस्तक्षेप करत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी बारामतीत सक्रिय भूमिका घेतली नव्हती, हे विशेष उल्लेखनीय मानले जाते.
मात्र अजित पवारांच्या निधनानंतर हे चित्र बदलताना दिसत आहे. त्यांच्या अस्थीविसर्जनाच्या दिवशी शरद पवार बारामती तालुक्यातील नीरा-वाघज गावात पोहोचले आणि नीरा नदीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी केवळ प्रशासकीय नसून, ती राजकीय आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राजकीय वर्तुळात या पाहणीला ‘सांकेतिक पाऊल’ मानले जात असून, शरद पवारांनी या माध्यमातून स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीच्या नेतृत्वावरून चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी पुढे यावे, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत असताना, शरद पवारांनी स्वतः मैदानात उतरून आपण अजूनही बारामतीच्या नेतृत्वासाठी सक्षम आणि सज्ज आहोत, हे दाखवून दिल्याची चर्चा आहे.
नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून, बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचा तो संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…