महाराष्ट्र

त्या 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभ, कारण…

औरंगाबाद: संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी ७०,२१४ शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेच अंतर्गत इ-केवायसी झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरु करण्यात येणाऱ्या नमो योजनेच्या लाभापासून देखील हे शेतकरी वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी

संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १३,७२९ शेतकऱ्यांचा केवायसी करणे बाकी आहे. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात – ७५००, गंगापूर -८३००, कन्नड- ७६००, खुलताबाद -२७९४, पैठण- १२९२२, फुलंब्री- ५०७४, सिल्लोड- ७७३२, सोयगाव -३४३० शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

यामध्ये २१४७१ शेतकऱ्यांचे जमीनीचे बाबतचा कागदपत्राची जोडणी केलेली नाही. तर २८ हजार शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंक केलेले नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे मोबाईल नंबर खात्याला लिंक केलेले नाहीत. तर आधार नंबर चुकलेले आहे. त्याच्यामुळे आधार व्हेरीफाय होत नाही. त्यामुळे केवावयसी करण्यात अडचणी येत आहे.

शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घ्यावी

जिल्ह्यात पंतप्रधान पीक सन्मान योजनेचा तीन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेकदा केवायसी करण्यासाठी शिबीर लावण्यात आली आहेत. मोबईल नंबर अपडेट करणे तसेच आधार लिंक करणे या प्रक्रिया शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

6 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

6 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

8 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago