महाराष्ट्र

त्या 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभ, कारण…

औरंगाबाद: संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी ७०,२१४ शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेच अंतर्गत इ-केवायसी झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरु करण्यात येणाऱ्या नमो योजनेच्या लाभापासून देखील हे शेतकरी वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी

संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १३,७२९ शेतकऱ्यांचा केवायसी करणे बाकी आहे. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात – ७५००, गंगापूर -८३००, कन्नड- ७६००, खुलताबाद -२७९४, पैठण- १२९२२, फुलंब्री- ५०७४, सिल्लोड- ७७३२, सोयगाव -३४३० शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

यामध्ये २१४७१ शेतकऱ्यांचे जमीनीचे बाबतचा कागदपत्राची जोडणी केलेली नाही. तर २८ हजार शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंक केलेले नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे मोबाईल नंबर खात्याला लिंक केलेले नाहीत. तर आधार नंबर चुकलेले आहे. त्याच्यामुळे आधार व्हेरीफाय होत नाही. त्यामुळे केवावयसी करण्यात अडचणी येत आहे.

शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घ्यावी

जिल्ह्यात पंतप्रधान पीक सन्मान योजनेचा तीन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेकदा केवायसी करण्यासाठी शिबीर लावण्यात आली आहेत. मोबईल नंबर अपडेट करणे तसेच आधार लिंक करणे या प्रक्रिया शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

3 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

4 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

4 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

5 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

5 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

9 तास ago