मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर उल्हासनगर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्या मध्ये दोषी असलेल्या लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता त्यांना मोकाट सोडून दिल्याने साळवे वर झालेल्या अन्याय विरोधात ते गेल्या ८ दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणा आंदोलन करत आहेत.
परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही मोठे नेते आझाद मैदानात येऊन साळवे यांना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे हे साळवे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर येऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार होते. परंतु प्रदेश अध्यक्ष आल्या नसल्याने आंदोलन कर्ते नाराज झाले आहेत.
आझाद मैदानावरील आंदोलन कर्त्यांच्या हा आठ दिवसांचे आंदोलन पाहाता महाराष्ट्र शासनातील गृह विभागाचे उप सचिव सौ. यमुना जाधव यांनी आझाद मैदान पोलिसां मार्फत आंदोलन कर्ते नोवेल साळवे यांना मंत्रालयात बोलवून समस्या विषय विचारणा केली व ठाणे पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक पत्र पाठविण्याचे निर्देश दिले परंतु ही कारवाई समाधानकारक नसल्याने साळवे यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…