महाराष्ट्र

तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही

मुंबई: आपण दुर्लक्ष केल्यामुळे आणि वरवर प्रचार केल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं ते पुन्हा पाहायचं नाही. तुम्हाला पक्षाबद्दल प्रेम वाटत असेल तर गेल्या बारा वर्षात जो अपमान झाला आहे त्याचा बदला घेतला पाहिजे. गटाध्यक्ष आणि अन्य दोन लोकांची यादीनुसार नावे माझ्याकडे आली पाहिजे. अन्यथा मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत स्पष्ट सांगितले आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक येथे शाखाध्यक्षांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, साईनाथ बाबर उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदान यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्याकडे चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे. एका वॉर्डात 16 ते 22 मतदार याद्या येतात. प्रत्येक यादीसाठी दोन माणसं ठेवायचे आहेत. आणि एक गटाध्यक्ष नेमायचा आहे. गटाध्यक्ष हा पक्षाशी संबंधित आंदोलन करणारा पाहिजे. जी दोन माणसं आहेत ती फक्त निवडणुकीसाठी पाहिजे. ती आंदोलनासाठी नको आहेत. त्या दोन माणसांनी फक्त यादीवर काम करायचा आहे. वॉर्डात 1200 माणसं राहतात त्यांच्याऐवजी कोण राहतं का? 1200 माणसांचं मतदान यादीत नाव आहे का? सतत याची पडताळणी केली पाहिजे.” दुसरं म्हणजे प्रत्येक शाखाध्यक्षांनी तुमच्याकडे असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून एक यादी काढायची. त्यामध्ये तुमच्या मतदार संघातील लोक असली पाहिजे. ज्यांची नाव तुम्ही काढाल त्यांच्याशी व्यक्तिगत तुम्ही चर्चा कराल. त्यांना विचारा आमचा बूथ एजंट म्हणून काम करशील का? मतदानावेळी तो तिथे हजर असला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.

एकाच घरात 80 माणसं मतदार असल्याचा समोर आले आहे. मग ही परिस्थिती पुण्यात असेल तर तुम्ही कशी निवडणूक लढणार आहात? मतदार यादी कुणाला घुसवले हे तुम्हाला काय माहिती? कोणत्याही नावाने माणसं मतदार यादीत घुसवली आहेत. ती तुम्हाला आत्तापासून तपासता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरे जाणार आहात? मग आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या? निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा मी सांगितलेलं काम करावे लागेल, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गटाध्यक्ष आणि अन्य दोन माणसं, अशी एकूण तीन लोकांची यादीनुसार नावे मला आली पाहिजे. तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

3 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

9 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

9 तास ago