मुंबई: आपण दुर्लक्ष केल्यामुळे आणि वरवर प्रचार केल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं ते पुन्हा पाहायचं नाही. तुम्हाला पक्षाबद्दल प्रेम वाटत असेल तर गेल्या बारा वर्षात जो अपमान झाला आहे त्याचा बदला घेतला पाहिजे. गटाध्यक्ष आणि अन्य दोन लोकांची यादीनुसार नावे माझ्याकडे आली पाहिजे. अन्यथा मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत स्पष्ट सांगितले आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक येथे शाखाध्यक्षांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, साईनाथ बाबर उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदान यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्याकडे चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे. एका वॉर्डात 16 ते 22 मतदार याद्या येतात. प्रत्येक यादीसाठी दोन माणसं ठेवायचे आहेत. आणि एक गटाध्यक्ष नेमायचा आहे. गटाध्यक्ष हा पक्षाशी संबंधित आंदोलन करणारा पाहिजे. जी दोन माणसं आहेत ती फक्त निवडणुकीसाठी पाहिजे. ती आंदोलनासाठी नको आहेत. त्या दोन माणसांनी फक्त यादीवर काम करायचा आहे. वॉर्डात 1200 माणसं राहतात त्यांच्याऐवजी कोण राहतं का? 1200 माणसांचं मतदान यादीत नाव आहे का? सतत याची पडताळणी केली पाहिजे.” दुसरं म्हणजे प्रत्येक शाखाध्यक्षांनी तुमच्याकडे असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून एक यादी काढायची. त्यामध्ये तुमच्या मतदार संघातील लोक असली पाहिजे. ज्यांची नाव तुम्ही काढाल त्यांच्याशी व्यक्तिगत तुम्ही चर्चा कराल. त्यांना विचारा आमचा बूथ एजंट म्हणून काम करशील का? मतदानावेळी तो तिथे हजर असला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.
एकाच घरात 80 माणसं मतदार असल्याचा समोर आले आहे. मग ही परिस्थिती पुण्यात असेल तर तुम्ही कशी निवडणूक लढणार आहात? मतदार यादी कुणाला घुसवले हे तुम्हाला काय माहिती? कोणत्याही नावाने माणसं मतदार यादीत घुसवली आहेत. ती तुम्हाला आत्तापासून तपासता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरे जाणार आहात? मग आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या? निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा मी सांगितलेलं काम करावे लागेल, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गटाध्यक्ष आणि अन्य दोन माणसं, अशी एकूण तीन लोकांची यादीनुसार नावे मला आली पाहिजे. तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…