महाराष्ट्र

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? पंतप्रधान मोदींची बंगाल सरकारवर जोरदार टीका

बंगाल: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ऑल इंडिया ट्रेनमोल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनरजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनॅशनल संटल कॉन्फरेन्स चे ठिकाण अचानक बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्रपती मुर्मू यांनीही दुर्मिळ पाऊल उचलत पश्चिम बंगाल सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की उत्तर बंगालमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेसाठी राज्य प्रशासनाने परवानगी नाकारली. तसेच त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री स्वागतासाठी उपस्थित नव्हता.

“ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि अभूतपूर्व आहे. लोकशाही आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामुळे दुःख झाले आहे. राष्ट्रपती महोदया स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेली वेदना आणि संताप भारतातील लोकांच्या मनातही खोल दुःख निर्माण करणारा आहे,” असे मोदी यांनी म्हटले.

तसेच “पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राष्ट्रपतींचा हा अपमान राज्य प्रशासनामुळे झाला आहे. संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे इतक्या निष्काळजीपणे पाहणेही दुर्दैवी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात नेमके काय घडले?

9th इंटरनॅशनल संथाळी काँकलावे सुरुवातीला बिधाननगर येथे आयोजित करण्यात येणार होता. मात्र राष्ट्रपती मुर्मू यांच्या म्हणण्यानुसार राज्य प्रशासनाने गर्दीचे कारण देत कार्यक्रमाचे ठिकाण अचानक बदलून गोषयपूर , बगदोगरा एअरपोर्ट जवळ हलवले.

कार्यक्रम आयोजकांनी नव्या ठिकाणी स्टेजची अपुरी व्यवस्था आणि स्वच्छतागृहांच्या खराब सुविधांबाबत तक्रार केली. यानंतर राष्ट्रपती मुर्मू फान्सीडेवा परिसरातील बिधाननगर येथे गेल्या. हा भाग मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेला आहे. त्या वेळी त्यांनी सांगितले की सर्व संथाल लोकांना दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होणार नाही.

“कदाचित प्रशासनाला वाटले असेल की कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. राष्ट्रपती येतील, रिकाम्या ठिकाणी कार्यक्रम करून परत जातील असे त्यांनी विचार केले असावे. त्यांच्या मनात काय होते मला माहीत नाही, पण यामुळे मला खूप दुःख झाले,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचाही मुद्दा उपस्थित केला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा कोणताही मंत्री उपस्थित नव्हता. फक्त गौतम देब, सिलिंगुरी चे महापौर, हेच स्वागतासाठी उपस्थित होते.

“मी देखील बंगालचीच मुलगी आहे. तरीही मला येथे येऊ दिले जात नाही. ममता ‘दीदी’ माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. कदाचित त्या काही कारणामुळे माझ्यावर नाराज असतील. तरीही मला त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. त्या सुखी राहोत आणि तुम्ही सर्वही आनंदात राहा,” असे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले.

दरम्यान भाजपने या घटनेला टीएमसी सरकारखालील “घटनात्मक व्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास” असे म्हटले. भाजप नेते अमित माळवीया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जेव्हा एखादे राज्य सरकार भारताच्या राष्ट्रपतींच्या पदाच्या सन्मानाकडे दुर्लक्ष करते, तेव्हा ते केवळ प्रशासनिक अपयश नसून घटनात्मक शिष्टाचाराचा पूर्ण ऱ्हास दर्शवते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

9 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

11 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago