महाराष्ट्र

ग्रामपंचायतमधील कामे पारदर्शक पद्धतीने झाली का? जाणून घ्या RTI चा उपयोग करून..

संभाजीनगर: ग्रामपंचायतीतील पारदर्शकता राखण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा (RTI Act, 2005) हा एक प्रभावी मार्ग आहे.

RTI द्वारे आपण तपासू शकता

कामे पारदर्शक पद्धतीने झाली का

निधीचा वापर योग्यरीत्या झाला का

कोणते विकास प्रकल्प मंजूर झाले?

RTI अर्जाद्वारे ग्रामपंचायतकडून कोणती माहिती मिळवू शकता

ग्रामपंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प आणि निधी वाटप

पाणी, रस्ते, वीज यांसाठी खर्च झालेला निधी

मंजूर शासकीय योजना व अंमलबजावणी अहवाल

ग्रामसभा निर्णय, ठराव आणि बैठकीचे अहवाल

MNREGA अंतर्गत दिलेली कामे आणि कामगारांची माहिती

विकास कामांची निविदा आणि ठेकेदारांची यादी

सरपंच/सदस्यांचे मानधन, प्रवास भत्ते आणि इतर खर्च

सरकारी लाभार्थ्यांची यादी (घरकुल, वृद्धापकाळ पेन्शन, इ.)

पाणी टँकर, कचरा व्यवस्थापन सेवांचा अहवाल

RTI अर्ज कसा करायचा

अर्ज तयार करा

साध्या कागदावर किंवा अधिकृत RTI फॉर्मवर लिहा

अर्ज सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) यांच्याकडे द्या

माहिती स्पष्ट आणि मुद्देसूद मागा

RTI अर्जाचा नमुना

प्रतिः

सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO),

[ग्रामपंचायत नाव],

[तालुका],

[जिल्हा], महाराष्ट्र

विषयः माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत माहिती मागणी

महोदय,

कृपया मला खालील माहिती पुरवावीः

1) [स्पष्टपणे माहिती लिहा]

2) [कागदपत्रांची प्रत मागा]

मी माहितीचा अधिकार कायदा, 2005 अंतर्गत ही माहिती मागत आहे.

शुल्क म्हणून ₹10/- चा पोस्टल ऑर्डर / डीडी / कॅश जमा करीत आहे.

आपला,

[नाव]

[पत्ता]

[संपर्क क्रमांक]

अर्ज कुठे द्यायचा

ग्रामपंचायतीच्या PIO कडे द्या

पोस्टाने पाठवायचा असल्यास स्पीड पोस्ट/रजिस्टर पोस्ट वापरा

RTI शुल्क किती

सामान्यतः ₹10/-

कागदपत्रांसाठी ₹2 प्रति पान

BPL कार्डधारकांसाठी मोफत (BPL कार्ड जोडा)

उत्तर किती दिवसात मिळेल

30 दिवसांच्या आत माहिती मिळणे अपेक्षित

न मिळाल्यास First Appeal दाखल करा

उत्तर न मिळाल्यास काय करायचे

प्रथम अपील (First Appeal) संबंधित वरिष्ठ अधिकारीकडे

नंतर राज्य माहिती आयोग (SIC) कडे अंतिम अपील

RTI वापरण्याचे फायदे

भ्रष्टाचार उघड करता येतो

विकास निधीचा योग्य वापर तपासता येतो

पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करता येते

सरकारी योजनांचा लाभार्थी कोण हे समजते

महत्त्वाच्या टिप्स

फक्त आवश्यक माहितीच मागा

स्पष्ट व संक्षिप्त भाषा वापरा

अर्जाची प्रत स्वतःजवळ ठेवा

पोस्टाची रसीद जतन करा

गरज असल्यास RTI कार्यकर्ते/वकील यांचं मार्गदर्शन घ्या

RTI म्हणजे आपल्या हक्काची किल्ली

ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्न विचारण्याचा आणि पारदर्शकतेची मागणी करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

11 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

14 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

14 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

14 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

14 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

14 तास ago