महाराष्ट्र

छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला.

छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. त्यानंतर गुंतवणूकदारांना नोटीस आल्या आहेत. यावर कारवाईसाठी गतीने पावलं उचलण्याची आवश्यकता असताना ती उचलली जात नाही याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच गुंतवणूकदारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांच्या तीव्र भावना उमटल्या आहेत. त्यामुळे सरकार व संबंधित खात त्यांना न्याय केव्हा देणार , असा प्रश्न आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. या पतसंस्थेच्या मालमत्तांचे मूल्य मोठया प्रमाणात निघालं आहे , तरी खातेधारकांना न्याय मिळाला नाही त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आलं की , या पतसंस्थेत १८० कोटी रुपयांचा अफरातफर झाली आहे. लेखा परीक्षण अहवालात संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी अशा ५१ जणांवर १०३ कोटी १७ लाख रुपयांचा अपव्यवहारांचा गुन्हा दाखल केला आहे. यात १२ संचालक, १ व्यवस्थापक, ३ कर्मचारी ,१४ व्यक्तिगत कर्जदार, संस्था कंपनी, १२ जमीनदार, २ सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. १५ लोकांना अटक व दोघांना जामीन मिळाला आहे.

हे पैसे वसूल करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. ती त्वरेने सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.८७६ कर्जदारांकडून २ प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहेत. १८ मालमत्ता २२ कोटी ८७ लाख लिलावद्वारे विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच खातेदारांना हे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

4 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

6 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago