मुंबई: निषेध, आंदोलने, पत्रके यांना धार तेव्हाच येईल, जेव्हा माध्यमात शिंदे-फडणवीस यांना बहिष्कृत केले जाईल. उठसूठ फालतू विषयावर ट्विट करणाऱ्या प्येमचे या विषयावर काहीही ट्वीट नाही. गृहमंत्र्याला घेराव घालण्याचे आंदोलन हवे. कायदा-सुव्यवस्थेची राज्यात वाट लागली आहे.
भाजपशी संबंधित वार्ताहर हे खासगी भानगडीत पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत गैरवापर करुन नको ते गुन्हे दाखल करुन घेत आहेत. गृह खात्याच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे आता गृहमंत्र्याला रत्नागिरी घटनेचा जाब विचारायला हवा. राज्याच्या श्येमला तर काही पडलेलीच नाही. ते सदैव तंद्री आणि तारेत असतात. काल ठाण्यातील टेंभी नाक्याचे श्येम म्हणूनच जणू वावरत होते. राज्याच्या विचार कधी करणार? रत्नागिरीतील इतक्या भयानक घटनेवर सारे मूग गिळून गप्प आहेत.
निषेध आंदोलन होईल, घोषणा होतील, फलक झळकावले जातील… पुढे काय? म्हणून थेट गृहमंत्र्याला जाब विचारायला हवा. निषेध आंदोलनात मंत्रालयातून खाली उतरून गृहमंत्री जाईल का आंदोलनस्थळी निदर्शकांना सामोरा? यापूर्वी पत्रकारांनी असे करवून घेतले आहे. त्यामुळे भूमिका सोयीने आणि सिलेक्टीव्ह नको. गृहंमंत्र्याला नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला भाग पाडा, असे होत नाही तोवर CM, DCM यांच्या प्रसिद्धीवर बहिष्कार घाला. करुया आजपासून सर्व मिळून सुरुवात? आंदोलनाचा दणका प्रसिद्धीपिपासूंना बसायला हवा!
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…
नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक…