महाराष्ट्र

टीईटी पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसचा सलग तिसऱ्या दिवशी एल्गार

मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने भाजपा महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर शनिवारी ठाण्यात फुटल्याचा आरोप झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. राज्य सरकारला एकही परीक्षा पारदर्शक आणि सुरळीतपणे घेता येत नसल्याचा आरोप करत सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची टीका करण्यात आली.

मागील महिन्यात नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच आता टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळेही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.

यापूर्वी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तसेच मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते.शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

1 तास ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

1 तास ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

1 तास ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

1 तास ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

2 तास ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

2 तास ago