मानवंदनेसाठी शासनाचे कोणी येईल याचा विचार करत नाही…

राजकीय

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टीका

शिक्रापूर (शेरखान शेख): नवीन वषार्ची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने तसेच कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करत केली असून मी करणी सेने सारख्या चिल्लर लोकांवर काही बोलणार नाही आणि याठिकाणी शासनाच्या वतीने कोणी येईल की नाही याचा विचार करत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी करणी सेनेवर बोलण्याचे त्यांनी टाळले पण पण यांचे जे बोलविके धनी आहेत त्या भाजपा मधल्या कोणत्याही प्रतिनिधीने हे बोलून दाखवले मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देवू असे सांगत सत्तेतील कोणताही नेता येथे येणे अपेक्षित नाही कारण सरकारच पेशवाईचे असुन ज्या पेशवाईचा पाढाव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक असल्याचे अंधारे यांनी सांगत मला गेली 4 वर्षे याठिकाणी मज्जाव करण्यात येत होता. मात्र यावर्षी मज्जाव केला नसल्याने याठिकाणी नतमस्तक होता आले.

 

याठिकाणी येण्यासाठी बसच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असताना सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी लोकांना येण्यापासुन मज्जाव तर प्रशासन करत नाही ना असा सवाल यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. दरम्यान अंधारे यांचा सदर ठिकाणी विजयस्तंभाची प्रतिकृती देत सन्मान करण्यात आला.