मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्यसरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लिम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
सबका साथ, सबका विकास हा मंत्र मोदींनी दिला मात्र २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लिम समाजाबाबत काय काय घडलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्यसरकार हे सर्वेक्षण करत आहे मात्र राज्यसरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्यांचे स्वागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…