राजकीय

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार; आदित्य ठाकरे

मुंबई: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता ?” हे विचारा असं आवाहन केल आहे.

महाराष्ट्र देशाला आजवर दिशा देत आल आहे. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, सुपीक जमीन आहे. कुशल तरुण आहेत. पण या राज्यातून प्रकल्प राज्यातून परत जाताय. पर राज्यात प्रकल्प जाण्याचं वाईट वाटत नाही, तर आपल्या राज्यातून प्रकल्प इथे न थांबता परराज्यात जातायत त्याचं वाईट वाटतय. महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही तर देश मागे जाईल. पण महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकलेत असं म्हणत स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना करत जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केल आहे.

गृहमंत्र्यांना आजवर एवढं हतबल पाहिलं नाही

राज्यातील प्रकल्प गेले तरी मोठा प्रकल्प राज्यात आणू म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते आणू शकले नाहीत . त्यावरून आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढं हतबल आजवर कधीही पाहिलं नाही . आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही, असं म्हणत संभाजीनगर इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

गद्दार आमदार म्हणतात चुन चुन के मारेंगे, खरं तर मागे पाठीत वार करणारे पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे. तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करतं पण कारवाही होत नाही. तर काही मंत्री संवीधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करतं , पण तरीही कोणितीही कारवाही न करता केवळ समज दिली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

12 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

16 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

16 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

16 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

17 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

17 तास ago