शिरूर तालुका

ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक उर्जा महत्वाची: प्रा. ईश्वर पवार

शिक्रापूर: शालेय जीवनात युवकांना कोणतेही ध्येय पूर्ण करायचे असल्यास विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तसेच सकारात्मक उर्जा आवश्यक असल्याचे मत चांदमल ताराचंद महाविद्यालयाचे प्रा. ईश्वर पवार यांनी व्यक्त केले.

आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमात बोलताना प्रा. ईश्वर पवार बोलत होते. याप्रसंगी प्रा. जनार्धन नायर, प्रा. केशव गाडेकर, अंबादास गावडे, दिलीप वाळके, संतोष हिंगे, सुप्रिया हिंगे, सुप्रिया काळभोर, सुहास बिडगर, सतिश अवचिते, ज्योती गजरे, नितिन गजरे, नितीन गरुड, शरद शेलार, बाबूराव मगर, मच्छिंद्र बेनके यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कठोर परीश्रम व चिकाटीच्या जोरावर आपण कोणत्याही ध्येया पर्यंत पोहचू शकता. तसेच सकारात्मक विचार, प्रामाणिक कष्ट, चिकाटी यांसह आई, वडील व गुरूजनांचे आशिर्वाद बरोबर असतील तर यशाचे शिखर गाठणे अवघड नाही असे प्रा. ईश्वर पवार यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात प्रचंड परीश्रम करण्यासाठी अनुकूल वातावरण असून बहुजनांच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक प्रगतीतील शाहू महाराजांनी केलेले कार्य सर्वश्रूत असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके यांनी केले, तर नितीन गरूड यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

47 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

3 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

8 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

8 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

8 तास ago