शिरूर तालुका

लाखेवाडीत किरकोळ वादातून शेतकऱ्याला मारहाण

शिक्रापुर (शेरखान शेख) मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीत शेतात सोडलेल्या पाण्याचा तसेच झाडाला म्हैस बांधल्याबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अंकुश गजाबाज चोरमले या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मलठण येथील लाखेवाडीचे शेतकरी नामदेव मावळे हे त्यांच्या शेतात गेलेले असताना त्यांच्या शेताच्या बांधावर सीताफळाच्या झाडाला म्हैस बांधलेली तसेच शेतात पाणी सोडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी शेजारील अंकुश चोरमले यांना याबाबत जाब विचारला. त्यामुळे अंकुश याने चिडून नामदेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली, याबाबत नामदेव ठकुजी मावळे (वय ७४) रा. लाखेवाडी, मलठण ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी येथे अंकुश गजाबाज चोरमले रा. लाखेवाडी, मलठण ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनंजय थेऊरकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

8 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

10 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

11 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

11 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

13 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

13 तास ago