शिरुर (अरुणकुमार मोटे): वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवार (दि. ८) सायंकाळी पावणे 5 च्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता मात्र तपास लागला नाही.
पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा, जि. वाशिम) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठे मोठे खड्डे असल्याने ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी असा प्रत्यक्ष दर्शींचा अंदाज आहे.
महीला पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.
सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे, असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.
कुंड पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी आणि नगर जिल्ह्यातील निघोज या गावांच्या सीमेवर असून निघोज बाजूकडून टाकळी हाजी हद्दीकडे येत असताना निघोज हद्दीत हा प्रकार घडला आहे.वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी संपर्क साधला असून सर्वजण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…