shirur-pi-sanjay-jagtap
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. शिवाय, आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा, असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
शिरूर पोलिस स्टेशन यांच्या संकल्पनेतून ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून बालाजी विश्व विद्यालयामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, पी.एस.आय सुजाता पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक बनकर, समुपदेशन केंद्राच्या गायत्री दौंडकर आदी मान्यवरांनी विद्यालयाला भेट दिली.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. वेगवेगळे उदाहरण देऊन मोबाईल पासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. जे चांगले आहे तेच विद्यार्थ्यांनी घ्यावे हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच पी.एस.आय सुजाता पाटील व गायत्री दौंडकर, शाळेचे मुख्यध्यापक विनायक म्हसवडे यांनी किशोरवयीन मुलींना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या काही तक्रारी असेल तर पोलिस हे तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्वास निर्माण केला. अडचणीच्या वेळी पोलिसांचे सहकार्य घ्यावे. कोणतीही अडचण आल्यास पोलिस आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती चत्तर यांनी केले.
शिरूर तालुक्यात कोयता दाखवत रस्त्याने दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात
शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…
शिरूर पुरवठा विभागात तब्बल दोन हजार रेशनकार्ड तयार…
शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!
हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…