शिरूर तालुका

शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील बाबुराव नगर येथे पुणे-नगर महामार्गावर दि ६ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली असुन या अपघातात एका स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संभाजी शिवाजी सरड (वय ५०) मूळ रा. बाभुळसर पूर्व, सध्या रा. बाबुराव नगर, संग्राम अपार्टमेंट, शिरुर) हे स्वतःची स्विफ्ट कार क्रं एम एच १२ पी झेड ०३६४ घेऊन रस्ता पार करत होते. त्याचवेळी नगर कडून पुणे कडे जाणाऱ्या एम एच १२ डब्ल्यू एक्स ६१२४ क्रमांकाच्या पिकअप जीपने भरधाव वेगात त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या धडकेत कारच्या पुढील टायर व बोनेटचे नुकसान झाले असुन अपघातानंतर संबंधित पिकअप चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहायक फौजदार साबळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

5 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

5 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

6 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

6 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

1 दिवस ago