शिरूर दि. ९ ( अरुणकुमार मोटे): पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविंदणे येथील भाऊसाहेब झुंबर भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गणेश हा वडिलांना शेतीच्या कामात नेहमी मदत करत असे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात पाऊस सुरू असताना, जनावरांना पाणी नसल्याने शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करून येतो, असे सांगून गणेश घरातून निघाला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
गणेशचा शोध घेत वडील भाऊसाहेब शेतात गेले. कृषी पंपाजवळ पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला. पंपाच्या विद्युत पेटीजवळ गणेश जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेला होता. पंपाचा विद्युत बॉक्स उघडा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रमेश भोर यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पारगाव कारखाना येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
गणेशला तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. अवघ्या १८ वर्षांच्या होतकरू युवकाचा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सविंदणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भोर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…
विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…
मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…
एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…
शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…
मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…