शिरूर तालुका

कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का बसून सविंदणेतील १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर दि. ९ ( अरुणकुमार मोटे): पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सविंदणे येथील भाऊसाहेब झुंबर भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गणेश हा वडिलांना शेतीच्या कामात नेहमी मदत करत असे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात पाऊस सुरू असताना, जनावरांना पाणी नसल्याने शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करून येतो, असे सांगून गणेश घरातून निघाला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

गणेशचा शोध घेत वडील भाऊसाहेब शेतात गेले. कृषी पंपाजवळ पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला. पंपाच्या विद्युत पेटीजवळ गणेश जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेला होता. पंपाचा विद्युत बॉक्स उघडा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रमेश भोर यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पारगाव कारखाना येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

गणेशला तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. अवघ्या १८ वर्षांच्या होतकरू युवकाचा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सविंदणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भोर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा…

4 तास ago

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते…

4 तास ago

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा…

4 तास ago

आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या…

4 तास ago

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या…

18 तास ago

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…

21 तास ago