शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील विद्याधाम प्रशाले शाळेतील खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवून राज्य पातळीवर मजल मारली असल्याची माहिती विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य योगेश जैन यांनी दिली आहे.
शिरुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील वैष्णवी युवराज रासकर हिने विभागीय पातळीवरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम मिळवत सुवर्णपदक पटकावले असून तिची राज्य पातळीवर निवड झाली आहे, तर कार्तिक कार्तिक गोरक्षनाथ पुजारी याने जिल्हास्तरीय ओपन एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विभागीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. कुस्ती स्पर्धेमध्ये समर्थ खेतमाळीस, गवळी रेवननाथ, ढेरंगे प्रताप, येलभर निलेश या खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
संग्राम शेवाळे याने जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला तर सायली सातव हिची लांब उडी स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर निवड झाली असून नंदिनी गांधी व स्वाती शेडगे यांनी तायक्वांदो कराटे प्रकारात जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला तसेच आफरीन मण्यार, फलके गौरी व कार्तिक पुजारी यांची कराटे क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर निवड झाली असून अशा पद्धतीने विद्याधामच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे.
सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकू येवले, क्रीडा शिक्षक भाऊसाहेब करंजुले, मच्छिंद्र बनकर, हरी पवार, संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य योगेश जैन, उपप्राचार्य प्रकाश कल्याणकर, पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, निळकंठ देवळालीकर यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…