शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात अहिल्याबाईंच्या स्मारकासाठी जागा द्या

अहिल्या विकास प्रतिष्ठानची शिरुर नगर परिषदेकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक बनवण्यासाठी सरकारी मालकीची असलेली राखीव जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरुर तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून धनगर समाजाचे प्रेरणास्थान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत. मात्र शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक होणे गरजेचे असताना धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास देखील धनगर बांधव तयार असल्याने शिरुर तालुक्यात सदर स्मारकासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी सरकारी मालकीची राखीव जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

1 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

11 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

11 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago